शिर्डी लाईव्ह ( प्रतिनिधी) :-
उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सर्वाधिक काळ याचिका चालून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ४८ वर्षाने उच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष अजित काळे यांनी तळेगाव दिघे येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विक्रांत काले व नानासाहेब जवरे यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करून सदर जनहित याचिकेत खंडपीठाने तीन मे रोजी अकोलेतील ० ते २८ कि. मी.चे काम चालू करण्याचे आदेश दिल्याने व त्याचे काम मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरु झाल्याने या याचिकेत महत्वाची भूमिका निभावणारे वकील अजित काळे यांचा कृती समितीच्या वतीने काल तळेगाव दिघे येथे माहेर मंगल कार्यालयात वाल्मीचे प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार समारंभ व कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले हे होते.
सदर प्रसंगी कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष विजय सपकाळ, वकील श्री देशमुख, दर्शन पोखरकर, पाहुणे पाटील, श्री कोरडे, बाळासाहेब पवार, श्री तारडे, तांदळे, अभिषेक हजारे, विजय पाटील, दत्ता पाटील, श्री वाकलेकर, संघटक नानासाहेब गाढवे, जेष्ठ नेते विजयचंद काले, शकुंतला काले, जयेंद्र काले, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, सचिव बाबासाहेब गव्हाणे, विठ्ठलराव पोकळे, माजी उपाध्यक्ष रमेश दिघे, गंगाधर रहाणे, कौसर सय्यद, अशोक गांडूळे, सोन्याबापू उऱ्हे सर, ज्ञानदेव शिंदे गुरुजी, तानाजी शिंदे, चंद्रकांत कार्ले, उत्तमराव जोंधळे, नवनाथ मोटे, विठ्ठलराव देशमुख, संदेश देशमुख, आबासाहेब देशमुख, नामदेव दिघे, भाऊसाहेब विलास गुळवे, बाळासाहेब शेळके, डी. एम.चौधरी, दिलीप खालकर, बाळासाहेब सोनवणे, कैलास गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, श्री ढमाले सर,शिवनाथ आहेर, विश्वनाथ थोरात, आदी प्रमुख मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, निळवंडेचा लढा लढणे एवढे सोपे नव्हते, न्यायव्यवस्था पुराव्यावर चालते तेथे भावनेला मुळीच स्थान नसते. त्या बाबतीत पत्रकार नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी माहिती अधिकारात आम्हाला भरपूर पुरावे दिले.याआधीही न्यायिक अडचणी होत्या पूर्वीचे न्यायालयाचे आदेश बदलणे सोपे नसते. व ती प्रक्रिया पार करणे ही बाब अवघड होती मात्र पुरावे सक्षम असल्याने या बाबत न्यायालयाचे समाधान करता आले या प्रकल्पात पडद्याडचे हितशत्रू जास्त होते. त्यामुळे लढाई जोखमीची होती.जवळपास दोन डझनभर वकील विरुद्ध होते.मात्र या प्रकरणी निवडक पुरावे कामी आले.व अकोलेतील बंद केलेले कालवे सुरु करण्याचे आदेश ३ मे रोजी न्यायालयाने दिले.७.९३ कोटींचा प्रकल्प २३६९ कोटींवर गेला होता.या बाबत तर आपण अखेर सी.बी.आय.चौकशी साठी स्वतंत्र याचिका दाखल करण्याचा निर्णयाप्रत आलो होतो याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. शिर्डी कोपरगावला पाणी कमी नसताना पाणी मागितले गेले. मात्र त्यांची जलसंपदाकडे मागणीच नव्हती असे सांगून आगामी काळातही आपण कालवा कृती समितीच्या पाठीमागे ठाम उभे राहू असे आश्वासन दिले.
सदर प्रसंगी जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी पाणी हि मोठी संपत्ती आहे. त्यावरून आत्ताच लढाया चालू झाल्या आहेत. या पुढे निळवंडेचे पाणी वापरण्यासाठी सहकारी पाणी वाटप संस्था स्थापन कराव्या सुक्ष्म सिंचनयोजना राबवाव्या लागतील असा सावधानतेचा इशारा दिला.व महाराष्ट्र जल संपत्ती प्राधिकरण २००५ चा समन्यायी कायदा यांचा अभ्यास करावा लागेल. आता न्यायालये या संस्थांकडे पाठवत असल्याने आधी या संस्थांकडे न्याय मागावा लागेल.शेतकऱ्यांना शिबिरे आयोजित करवून पाणी वापराचे प्रशिक्षण द्यावे लागेल असेही शेवटी सांगितले.
सदर प्रसंगी कालवा कृती समितीच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी यांचाही सत्कार व सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यांचा सत्कार अड.शाम डांगे यांनी स्वीकारला.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक नानासाहेब जवरे यांनीं केले.उपस्थितांना रुपेंद्र काले, विजय सपकाळ, मच्छीन्द्र दिघे, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब रहाणे व गंगाधर रहाणे यांनी केले उपस्थितांचे आभार रमेश दिघे यांनी मानले.