Friday, 5 July 2019

अंजनापूर येथे या वर्षी होणार ५८१ वृक्षांची लोखंडी जाळीसहीत लागवड






कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती ; 
आत्तापर्यंत २१५२ वृक्षांची लागवड आणि संवर्धन 
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                               कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे येत्या ६ ते ९ जुलै रोजी लोखंडी जाळीसहीत ५८१ वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. 
                  अंजनापूर गाव गेल्या पाच वर्षांपासून वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन करत असून हे सर्व वृक्षवेध फाऊंडेशन अंजनापूर "एक वृक्ष जिवनाचा" ह्या संकल्पने खाली कार्यरत असुन पर्यावरण संगोपन, वृक्ष लागवड आणी रोपन केलेले झाडे, १०० टक्के जगवण्यासाठी वचनबध्द आहे, प्रत्येक माणसाने निसर्गाच्या उपकारातुन उतरायी  होण्यासाठी प्रती वर्ष एक वृक्ष रोपण करून संपुर्ण रितीने संगोपन करावे हा मुळ उद्देश ठेऊन, वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या सहभागातुन त्यांच्या नावाने लोखंडी जाळी सहीत वृक्ष रोपण करून सगळे झाडे शंभर टक्के जगवले आहेत. या संकल्पनेवर कार्य करतांना आजपर्यंत शेतकरी कुटुंबातील ९० पेक्षा जास्त स्वयंसेवक मागील पाच वर्षापासून निस्वार्थ भावाने वृक्ष सेवा करत आहेत. जुलै २०१५ ते जुलै २०१८ पर्यत २१५२ वृक्ष लोखंडी जाळी सहीत रोपण करून शंभर टक्के जगवले आहेत. त्यासाठी संपुर्ण लागनारे पाणी विकत घेतलेले आहे. ह्या ही वर्षी ६ ते ९ जुलै २०१९ रोजी लोखंडी जाळी सहीत ५८१ वृक्ष अंजनापूर येथे रोपण करून शंभर टक्के जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्षारोपण करतांना थोडे वृक्ष लावुन ते संपुर्ण शंभर टक्के जगवण्यासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत कुठल्याही सरकारी मदतीशिवाय लोकसहभागातुन मोठे काम ऊभे केले आहे. वृक्षारोपण आणी वृक्षसंवर्धन या दृष्टिकोनातून ही संकल्पना राबवली तर मोठे सामाजीक परिवर्तन करणे शक्य आहे. हजारो झाडे लावण्यापेक्षा प्रत्येक गावातील लोकांनी एकत्र येऊन प्रत्येक वर्ष थोड्याच संख्येने वृक्षारोपण करून शंभर टक्के जगवले तर, मोठे हरित परिवर्तन शक्य आहे, एक वृक्ष जीवनाचा टीम झाडे आणी पाणी या बद्दल सामाजीक संदेश देऊन सतत कृतीशील आहेत. ह्या संस्थेवर कुठलेही कर्मचारी कार्यरत नाहीत, ह्या संस्थेचे वैयक्तिक ऑफीस नाही, ह्या संकल्पनेवर भारतातून अनेक राज्यातील सहयोग देनारे शिक्षीत आणी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक नामांकित लोकं जोडले गेले आहेत, संपुर्ण नियोजन अतीशय  नियोजनपूर्वक करून प्रतेक वर्ष एकदाच झाडे लावतात, पंरतु वर्षभर काळजी घेऊन शंभर टक्के जगवले आहेत. ही संस्था सरकारी नियमानुसार रजिस्टर्ड असुन, 12A आणी 80 G  ह्या नियमावलीत समाविष्ट झालेली आहे. सर्वांनी वृक्षारोपण अभियानात आपल्या पवित्र श्रमदानासाठी उपस्थिती नोंदवावी असे आवाहन एक वृक्ष जिवनाचा अंजनापूर टीमने केले आहे.
                            दिनांक ८ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत वृक्षसेवक व वृक्षमित्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यानंतर ८ ते १० वाजेपर्यंत स्नेहालय प्रेरित अनामप्रेम निर्मित अंध व दिव्यांग कलाकारांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.






No comments:

Post a Comment