Monday 30 December 2019

राष्ट्रीय सेवा योजना ही संस्काराची जननी - विनोद जवरे



शिर्डी लाईव्ह न्यूज:-
                        राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ही संस्काराची जननी असून विद्यार्थी दशेत ती प्रत्येकाला उपयुक्त असल्याचे मत पत्रकार विनोद जवरे यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजनाच्या हिवाळी शिबीर सोहळ्या प्रसंगी
 मार्गदर्शन करतांना  पत्रकार विनोद जवरे
.
                           कोपरगाव  तालुक्यातील बहादरपूर येथे एस एस जी एम महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी  मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एम. वाघमोडे, अधिकारी डॉ. के. एस. महाले, सदस्य डॉ. एस. पी. काळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब  चिमणराव रहाणे आदि मान्यवर उपस्स्थित होते.

                             
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करून समाजकार्य सेवेची शिदोरी या शिबिरातून घेतली पाहिजे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ग्रामीण भागातील जनजीवन आचार-विचार शिकवण देते विद्यार्थिदशेत शिस्तीला महत्त्व आहे.  त्यातून प्रत्येकाने ते अंगीकारावे असे ते म्हणाले.
                                                यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.





Monday 23 December 2019

आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्याना व्यवहारीक ज्ञान मिळते - रोहित टेके


रामेश्वर विद्यालयात आनंद मेळावा संपन्न


कोपरगाव : शालेय स्तरावर घेण्यात येणारा आनंद मेव्याचा उपक्रम खूप स्तुत्य आहे. यातून विद्यार्थ्यानी विक्रीसाठी आनलेल्या वस्तू त्या वस्तूंना तयार अथवा खरेदी करण्यासाठी आलेला खर्च व त्यांची विक्रीकरून मिळालेले पैसे यातून नफातोटा समजतो. त्यामुळे विद्यार्थ्याना व्यावहारीक ज्ञान मिळते असे प्रतिपादन पत्रकार रोहित टेके यांनी केले.

         कोपरगाव तालुक्यातील वारी येथील श्री.रामेश्वर विद्यालयामध्ये शनिवारी बालआनंद मोहोत्सव संपन्न झाला. त्याच्या उद्गघाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक काकासाहेब गवळी होते.
        या प्रसंगी मुख्याध्यापक काकासाहेब गवळी यांचेही  भाषण झाले. मेळाव्यासाठी असंख्य पालक, विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, पाणीपुरी, पाववडा सेंटर, भेळ सेंटर, विविध प्रकारचे दुकाने मांडली होती. पालक आणि विद्यार्थी यांनी या मेळाव्यात खरेदी करून विक्रेत्यांचा उत्साह वाढविला. या मेळाव्यात विद्यार्थ्यानी आनलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीतून जवळपास दहा हजाराची आर्थिक उलढाल झाली.  
        सदर आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक कैलास शेळके, सुनील निकाळजे, दत्तू साळुंके, रविंद्र रासकर, वसंत जाधव, बाळासाहेब तुपे, नारायण सुकटे, चंदू जोर्वेकर, तुकाराम जेठे, सुरेश सोनवणे, नितीन निकम, गोरख सोनवणे, व शिक्षिका अनुराधा शेळके, अनिसा पठाण यांनी मोलाचे सहकार्य केले.


रोहित टेके 


x

Saturday 5 October 2019

शरद आहेर ‘राष्ट्रनिर्माण’ पुरस्काराने सन्मानित

शिर्डी येथे वितरण ; विविध मान्यवरांची उपस्थिती 

शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
        कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादरपूर येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक श्री.शरद भाऊसाहेब आहेर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा यांनी सन २०१९-२० चा राष्ट्र निर्माण पुरस्काराने शिर्डी येथे सन्मानित करण्यात आले.
      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डी.वाय.एस.पी.शिर्डी पोलीस स्टेशन श्री.सोमनाथजी वाकचौरे साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी राहाता श्री.ज्ञानेश्वर वाकचौरे साहेब होते. रोटरी चे अध्यक्ष श्री.निखीलजी बोरावके, सेक्रेटरी निलेशजी गंगवाल, माजी अध्यक्ष श्री.गौरव भुजबळ, डॉ.गुंजाळ, श्री.शरदजी निमसे, श्री.राउत साहेब आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
       श्री.शरद आहेर यांनी हा पुरस्कार व्यासपीठावर जाऊन मान्यवरांच्या हस्ते पत्नी राजश्री, मुलगी श्रीशा व पोहेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्रजी ढेपले साहेब यांचे समवेत स्वीकारला.

       यावेळी सर्वश्री सूर्यभान रहाणे, कैलास रहाणे, सोमनाथ रहाणे, चंद्रकांत डोंगरे, सुधाकर अंत्रे, निवृत्ती बढे, अशोक गव्हाणे, रामदास गव्हाणे, सीताराम गव्हाणे, मनोज सोनवणे, मुरलीधर वाकचौरे, बाळासाहेब गोरे, नंदू दिघे, रविंद्र शिरोळे, गणेश पाचोरे, विकास डोंगरे, दत्तात्रय सासवडे, दत्तात्रय अभंग, महेंद्र चव्हाण, महेश भामरे, प्रशांत बोंडखळ, इरखेडे सर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

Monday 26 August 2019

पत्रकार विनोद जवरे यांना युवा आयडॉल पुरस्कार प्रदान




शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):- 


                                      कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील युवा पत्रकार विनोद जवरे यांना युवा ध्येय परिवाराच्यावतीने दिला जाणारा युवा आयडॉल हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच विश्व विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे व संपादक लहानु सदगीर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यांत आला. 
                                    पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जवरे यांना  देण्यात आला. सदर कार्यक्रम हा अहमदनगर येथील माउली सभागृह येथे पार पडला याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे पाटील  उपस्थित होते.  तसेच पुरस्काराबददल आ. स्नेहलता कोल्हे, आ. राजाभाऊ  वाजे, मा.खासदार. बबन नाना घोलप  आदींनी  विनोद चे  अभिनंदन केले आहे.


Wednesday 21 August 2019

कारवाडी- वडाची वाडी येथे भागवत सप्ताहाचे आयोजन


शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                   कोपरगाव तालुक्यातील कारवाडी- वडाची वाडी येथे बुधवार दिनांक २१ ऑगस्ट ते बुधवार दिनांक २८ ऑगस्ट या कालावधीमध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने होणार आहेत.
                  दिनांक २१ ऑगस्ट रोजी रामायणाचार्य सुखदेव महाराज चव्हाण, दिनांक २२ रोजी प्रसन्नकुमार महाराज धामने, दिनांक २३ रोजी अनिल महाराज जमधडे, दिनांक २४ रोजी भागवताचार्य अनिल महाराज तुपे, दिनांक २५ रोजी शिवचरित्रकार प्रवीण महाराज दुशिंग, दिनांक २६ रोजी संजीवनीताई गडाख, दिनांक २७ रोजी स्वरगंधर्व बाळासाहेब महाराज रंजाळे, यांची कीर्तने होणार आहेत. तर दिनांक २८ ऑगस्ट रोजी संगीत भागवताचार्य नामदेव महाराज शाश्री यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

                   सप्ताह काळात सकाळी ४ ते ६ काकडा, ६ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ४ भजन, सायंकाळी ५ ते ६ ज्ञानेश्वर प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर असे कार्यक्रम असणार आहेत. दि २८ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात गावातील तसेच नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले सर्वच ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे कारवाडी- वडाची वाडी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

Sunday 18 August 2019

बहादरपूर येथे गोपाजी बाबांचा यात्रोत्सव


रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
                                      कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र  बहादरपूर येथे  दि. १८  व १९  ऑगस्ट या दोन दिवस गोपाजी बाबा यांचा यात्रोत्सव होणार असून मोठा वैचारिक वारसा लाभलेल्या बहादरपूर  यात्रेत तालुक्यातील तसेच नासिक व नगर जिल्ह्यातील हजारो भाविक हजेरी लावत असतात.
                                        गोपाजी बाबांनी सुमारे २२५ वर्षांपूर्वी  पश्चिम बंगाल येथून संजीवनी विद्येचा अभ्यास करून बहादरपूर व परिसरामध्ये मोठे काम करून बहादरपूर येथे समाधी घेतली.  तेव्हापासून दर श्रावण महिन्यात हि यात्रा  भरते या यात्रेमध्ये सकाळी गोपाजी बाबांची विधिवत पूजा होऊन  त्यानंतर पारंपारिक झांजपथक व वाद्यांच्या सहायाने कावडीची सवाद्य मिरवणूक होते दि. १८ रोजी सायंकाळी  रथाची  मिरवणूक होणार असून यामध्ये सर्वांची उत्सुकुता असलेली फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. तर दि. १९ रोजी सकाळी ओंकारेश्वर येथून आणलेल्या गंगाजलाची कावडी व मशाल मिरवणूक होणार असून  दुपारी कुस्त्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये जिल्ह्यातील नामंवंत कुस्तीपटू हजेरी लावत असतात.
                               या वर्षीचे यात्रेचे नियोजन खकाळे  वाड्याकडे असून गावामध्ये व मंदिराला भव्य दिव्य अशी विद्युत रोषणाई करण्यात  आलेली आहे . सुमारे ७० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले  श्री गोपाजी बाबा यांच्या  मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात आहे.  या यात्रेमध्ये बहादरपूर व परिसरातील सर्व स्तरातील  लोक सहभागी होत असतात. तर  जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावत असतात.

शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूर च्या विद्यार्थ्यांचे यश ; शिक्षक सैंदाणे यांचा सत्कार


शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                                कोपरगाव तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद शाळेच्या श्री सैदाणे यांचा नाशिक चे विभागीय आयुक्त श्री. राजाराम माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत  शहापूर शाळेतून विद्यार्थ्यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

                                 तालुक्यातील शहापूर शाळेचे तंत्र स्नेही मुख्याध्यापक श्री सैंदाने सर यांचा  शिष्यवृत्ती परीक्षेत  शहापूर शाळेतून विद्यार्थ्यांची निवड झाल्याने सत्कार करण्यात आला. तालुका स्तरीय १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सदर प्रसंगी तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.सर्व शाळा नी कोपरगावाचा आदर्श घ्यावा  असे मत यावेळी माने यांनी व्यक्त केले. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सदस्य श्री राजेश आबा परजने उपस्थित होते. तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांनी प्रास्तविक सादर केले .आभार श्री आर के ढेपले यांनी मानले.

श्री सैंदाने यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्या हस्ते सत्कार

सैंदाने यांचा शाळांच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार

शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                                    कोपरगाव तालुक्यातील शहापूर शाळेचे तंत्र स्नेही मुख्याध्यापक श्री. सैंदाने सर यांचा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                                    त्यांनी तालुक्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना कोपरगाव तालुक्याची एक दिशा दर्शक वाटचाल नावाचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

                                   संवत्सर येथे तालुका स्तरीय कार्यशाळेस माने यांनी भेट दिली. सदर प्रसंगी  त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रत्येक शिक्षकाने तंत्र स्नेही व्हायला हवे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी प्रास्तविक सादर केले. आभार श्री आर के ढेपले  यांनी मानले.

Thursday 15 August 2019

शहापूर शाळेस लोक सहभागातून अनेक कामे

पालकांचे भरीव योगदान 

शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-
              
                      कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शहापूर शाळेत लोकसहभागातून अनेक कामे करण्यात आली असून यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक सोयी उपलभ झाल्या आहेत.
                                  शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी मिळून शाळेतील पिण्याच्या टाकीसाठी शाळेस योगदान दिले आहे. तसेच गावातील साई संकल्प ग्रुप यांच्याकडून शाळेस २० लेझीम व राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो मिळाले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक श्री सैंदाने सर यांच्या वतिने त्यांचा २६ जाने २०१९ च्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. गावातील सरपंच ग्रामसेवक यांनी शाळेसाठी योगदान देणारांचे आभार मानले. तसेच केंद्र प्रमुख श्री. ढेपले साहेब व गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी लोकसहभागाबद्दल शाळेचे व पालकांचे अभिनंदन केले.

लोकसहभागातून शहापूर शाळा डिजिटल

शिक्षकांच्या परिश्रमांना यश 
शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):-        
                                कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शहापूर शाळेने लोकसहभागातून शाळेतील सर्व वर्ग डिजिटल केले आहेत. गावातील पालकांच्या सहकार्याने ५४ हजार एवढी लोकवर्गणी जमा करून त्यातून शाळेस प्रोजेक्टर, एल इ डी घेतला. लोकसहभागासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री सैंदाने सर व सोनवणे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राहुल घारे यांनीही सहकार्य केले.
                                वर्ग डिजिटल केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीही इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांसारखे शिक्षण घेऊ शकतात. व विद्यार्थ्यांना दृक श्राव्य शिक्षण दिल्याने त्यांच्या आंतरिक कलागुणांना मोठी चालना मिळणार आहे.
                                 सरपंच श्री दिपक खंडीझोड यांनी शिक्षकांचे खूप खूप आभार मानले. शाळा डिजिटल केल्याने केंद्र प्रमुख श्री ढेपले साहेब यांनी शाळेच्या शिक्षकांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूर शाळेचे भरघोस यश ; सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत


शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी):- 
                              सन २०१७ - २०१८ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले असून कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शहापूर या शाळेतील इयत्ता पाचवी चे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. सन २०१७ - २०१८ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवत शाळेचे नावही मोठे केले आहे.
                               शहापुर शाळेचा निकाल १०० % लागला असून. ह्या शाळेतील शिक्षक श्री. सैंदाने ज्ञानेश्वर पांडुरंग यांनी वर्षभर तासिकांचे नियोजन करून विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला. तसेच परीक्षा घेऊनही प्रयत्न केले. सादर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.नितीन पाचोरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सैंदाने सर यांचे कौतुक केले. तसेच सदर परीक्षेस केंद्रप्रमुख श्री ढेपले सर यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांनी शाळेचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Saturday 10 August 2019

सप्ताहाचे अखेरचे दोन दिवस ; महत्वाच्या बाबी



            आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी सप्ताहाचा ७ व दिवस असून संध्याकाळी ९ ते ११ रामायानाचार्य ह भ प रामाराव महाराज ढोक यांचे कीर्तन होणार आहे. आजच्या दिवशी नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले सर्वच ग्रामस्थ, पाहुणे गावात येत असतात. यावेळी संध्याकाळच्या कीर्तनाला खूप मोठी गर्दी होते.

            या गर्दीमध्येही सर्वांना कीर्तनाचा व उत्सवाचा आनंद मिळावा यासाठी सर्वांनी थोडीशी काळजी घेणे आवश्यक आहे. रात्री कीर्तनाला आल्यानंतर आपली वाहने बाजारातळ, महादेव मंदिर प्रांगण, बस स्थानक परिसर, ग्रामपंचायत चौक अशा ठिकाणी पार्किंग केली तर सर्वांनाच बसायला जागा मिळेल आणि कीर्तन संपल्यानंतर सर्वजन घरीही वेळेवर पोहोचू शकतील. 

            तसेच काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी सकाळी ९ ते ११ ह भ प रामाराव महाराज ढोक यांचे कीर्तन होणार आहे यावेळी आपली वाहने मंदिर परिसरात व बस स्थानक परीसरात पार्किंग न करता इतरत्र पार्किंग करावी असे केल्याने मंदिर परीसरात गर्दी होणार नाही आणि कीर्तनाला व महाप्रसाद घेण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक राहील. कोणी संशयित व्यक्ती दिसल्यास त्यासंधार्भात ग्रामस्तांना कळवायचे आहेत.

            दुकानदार बांधवांणी आपली दुकाने मंदिर परिसरात न लावता वेशीच्या आत लावावी. कीर्तनासाठी जागा कमी पडत असल्याने येथे दुकाने लावल्यानंतर भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

सर्वजन या उत्सवाचा आनद घेऊ. 

Friday 2 August 2019

पंचमीपासून रांजणगाव देशमुख येथे भागवत सप्ताहाचे आयोजन


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                                    कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे रामायणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक नागपूर यांच्या प्रेरणेने तसेच ह भ प बबन महाराज गव्हाणे व ह भ प अशोक महाराज क्षीरसागर अमरावती, बबन महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि ५ ऑगस्ट ते  १२ ऑगस्ट या दरम्यान अखंड हरिनाम भागवत सप्ताहाचे आयोजन कारण्यात आले आहे.
                                     या सप्ताहात दि.५ रोजी हभप बाळासाहेब महाराज रंजाळे खैरी निमगाव, दि. ६ हभप पांडुरंग महाराज गिरी दि. ७  हभप माधव महाराज रसाळ इंदापूर दि. ८  हभप संजय महाराज धोंगडे त्र्यंबकेश्वर, दि. ९ हभप विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, दि. १० हभप शिवाजी महाराज देशमुख नेवासा, दि. ११  हभप रामराव महाराज ढोक व दि. १२ रोजी  ह भ प रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहेत. सप्ताह काळात सकाळी ४ ते ६ काकडा, ६ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ४ भजन, सायंकाळी ५ ते ६ ज्ञानेश्वर प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व नंतर हरिजागर असे कार्यक्रम असणार आहेत. दि १२ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात गावातील तसेच नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले सर्वच ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. समारोपाच्या दिवशी काकडा पेटवण्यासाठी भद्रा मारोती खुलताबाद येथून दरवर्षी मशाल आणली जाते या मशालीचे हे १४ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे रांजणगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


फोटो- श्री. क्षेत्र हनुमान देवस्थान रांजणगाव देशमुख  

रांजणगाव देशमुख येथे युवकाची आत्महत्या



रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                               कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील सचिन जगन रणधीर वय ३० वर्षे यांनी राहत्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
                              ही घटना दिनांक १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. यावेळी सचिन यांचा भाऊ किरण यांनी सचिनला पहिले असता आरडा ओरडा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राजेंद्र शेटे यांनी घटनास्थळी जाऊन सादर घटनेची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला दिली.
                           माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक दाणे व पोलीस कॉन्स्टेबल अभंग, पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन  घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर अतिशय शोकाकुल वातावरणात रांजणगाव देशमुख येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. 

Thursday 18 July 2019

मुरलीधर वर्पे यांचे निधन


रांजणगाव देशमुख (वार्ताहर) :-
                                        कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील प्रगतशील शेतकरी मुरलीधर रामजी वर्पे वय ९६ वर्षे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते रांजणगाव देशमुख सहकारी सोसायटीचे पंधरा वर्षे चेअरमन होते तसेच रांजणगाव ग्रामपंचायतीचे व स्थानिक स्कुल कमीटीचेही सदस्य पदही त्यांनी भुषाविले. त्यांच्या पश्चात सहा मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परीवार आहे.सामाजिक कार्येकर्ते भारत वर्पे,  नंदराम वर्पे यांचे ते वडील होत. त्यांचा दशक्रिया विधी २१ जुलै रोजी रांजणगांव देशमुख येथील पाझर तलावावर होणार असून यावेळी प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. 

Saturday 13 July 2019

अंजनापूर येथे ५ वर्षात २८८५ वृक्षांची लागवड आणि संवर्धन


विविध मान्यवरांची उपस्थिती, अंजनापूरचे काम देशासाठी प्रेरणादायी

शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-
                                      आजकाल झाडे अनेक ठिकाणी लावले जातात परंतु त्याचे शंभर टक्के जतन होत नाही. याला अंजनापूर अपवाद आसुन या गावात गेल्या पाच वर्षापासुन वृक्षलागवडीची चळवळ वृक्षवेध फाऊंडेशनच्या माध्यमातुन व गावातील युवक व आबालवृध्दांच्या सहकार्याने सुरु आहेत. या गावाने फक्त झाडे लावलीच नाही तर ती शंभर टक्के जगविली आहेत. येथील युवकांचे काम दिपस्तंभासारखे आहे. हे काम राज्यातील इतर गावांना नक्कीच प्रेरणादायी आहे असे मत अनेक मान्यवरांनी कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथे व्यक्त केले.

                                     अंजनापुर येथे 2015 साली ४५  झाडे लावुन वृक्षलागवडीची सुरुवात वृक्षवेध फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या मदतीने झाली मागील चार वर्षात २१५२ झाडे लावली ती शंभर टक्के जगविली आहेत यावर्षी ७३३ झाडांची लागवड करण्यात आली आसुन आता २८८५ झाडांचे रोपण झाले आहे. गावात सहा जुलै ते 9 जुलै या कालावधीत वृक्षलागवड करण्यात आली. या वृक्षलागवड सप्ताहच्या शेवटच्या दिवशी डॅा अलका नितु मांडके, उद्योजक ऑलिव्हर ग्युबर्ग, प्रशांत जोशी, एच.डी एफ सी बॅंकेच्या सी एस आर फंडाच्या देशाच्या प्रमुख श्रीमती नुसरत पठाण, डॅा प्रकाश माधव, राजा उपाध्यय, श्रीमती शाईन इंदुलकर, जयवंत गडाख, कृषी विकास संस्थेचे अमीत नाफाडे, सुमन ठाकुर, अमोल जाधव, स्वाती शाळीग्राम, डॅा सरोज मेहेत्रे, डॅा अजित कुलकुर्णी, आदि प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बापुसाहेब गव्हाणे होते.

                            यावेळी उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलतांना उद्योजक  ऑलिव्हर ग्युबर्ग म्हणाले कि, झाडाशिवाय जिवन अशक्य आहे. अंजनापुरकरानी सर्व झाडे जगवुन इतिहास निर्माण केला आहे. हे काम नक्कीच इतरांना प्रेरणादायी आहे.

                        डॅा. अलका मांडके म्हणाल्या कि,मला इथे आल्यानंतर उर्जा मिळाली आहे. आता यापुढे वारंवार येथे येत राहणार असुन या कामात सहभागी होणार आहे.

                         नुसरत पठाण म्हणाल्या कि, या गावातील सामाजीक उपक्रमाचां आम्ही एक भाग आहोत याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

                               अमीत नाफाडे म्हणाले कि, सामाजिक कामात अंजनापुरच्या युवकांचा सहभाग हा फार मोठा असतो. येणा-या काळात लोक आता राळेगणसिध्दी,हिवरे बाजार नंतर आता अंजनापुर पाहण्यासाठी नक्की येतील.

                                यावेळी एच.डी.एफ.सी बॅंक व कृषी विकास संस्था मलकापुर यांच्या वतिने हवामान केंद्राचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करुन ते वृक्षनेध फाऊंडेशन कडे हस्तातरीत करण्यात आले. यामुळे परीसरातील 25 किमी त्रिज्येतील हवामान अंजनापुरच्या शेतक-यांना एसएमएस ने कळणार आहे. यावेळी वृक्षसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्षवेधचे सर्व युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.



Friday 5 July 2019

अंजनापूर येथे या वर्षी होणार ५८१ वृक्षांची लोखंडी जाळीसहीत लागवड






कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती ; 
आत्तापर्यंत २१५२ वृक्षांची लागवड आणि संवर्धन 
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                               कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे येत्या ६ ते ९ जुलै रोजी लोखंडी जाळीसहीत ५८१ वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. 
                  अंजनापूर गाव गेल्या पाच वर्षांपासून वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन करत असून हे सर्व वृक्षवेध फाऊंडेशन अंजनापूर "एक वृक्ष जिवनाचा" ह्या संकल्पने खाली कार्यरत असुन पर्यावरण संगोपन, वृक्ष लागवड आणी रोपन केलेले झाडे, १०० टक्के जगवण्यासाठी वचनबध्द आहे, प्रत्येक माणसाने निसर्गाच्या उपकारातुन उतरायी  होण्यासाठी प्रती वर्ष एक वृक्ष रोपण करून संपुर्ण रितीने संगोपन करावे हा मुळ उद्देश ठेऊन, वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या सहभागातुन त्यांच्या नावाने लोखंडी जाळी सहीत वृक्ष रोपण करून सगळे झाडे शंभर टक्के जगवले आहेत. या संकल्पनेवर कार्य करतांना आजपर्यंत शेतकरी कुटुंबातील ९० पेक्षा जास्त स्वयंसेवक मागील पाच वर्षापासून निस्वार्थ भावाने वृक्ष सेवा करत आहेत. जुलै २०१५ ते जुलै २०१८ पर्यत २१५२ वृक्ष लोखंडी जाळी सहीत रोपण करून शंभर टक्के जगवले आहेत. त्यासाठी संपुर्ण लागनारे पाणी विकत घेतलेले आहे. ह्या ही वर्षी ६ ते ९ जुलै २०१९ रोजी लोखंडी जाळी सहीत ५८१ वृक्ष अंजनापूर येथे रोपण करून शंभर टक्के जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्षारोपण करतांना थोडे वृक्ष लावुन ते संपुर्ण शंभर टक्के जगवण्यासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत कुठल्याही सरकारी मदतीशिवाय लोकसहभागातुन मोठे काम ऊभे केले आहे. वृक्षारोपण आणी वृक्षसंवर्धन या दृष्टिकोनातून ही संकल्पना राबवली तर मोठे सामाजीक परिवर्तन करणे शक्य आहे. हजारो झाडे लावण्यापेक्षा प्रत्येक गावातील लोकांनी एकत्र येऊन प्रत्येक वर्ष थोड्याच संख्येने वृक्षारोपण करून शंभर टक्के जगवले तर, मोठे हरित परिवर्तन शक्य आहे, एक वृक्ष जीवनाचा टीम झाडे आणी पाणी या बद्दल सामाजीक संदेश देऊन सतत कृतीशील आहेत. ह्या संस्थेवर कुठलेही कर्मचारी कार्यरत नाहीत, ह्या संस्थेचे वैयक्तिक ऑफीस नाही, ह्या संकल्पनेवर भारतातून अनेक राज्यातील सहयोग देनारे शिक्षीत आणी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक नामांकित लोकं जोडले गेले आहेत, संपुर्ण नियोजन अतीशय  नियोजनपूर्वक करून प्रतेक वर्ष एकदाच झाडे लावतात, पंरतु वर्षभर काळजी घेऊन शंभर टक्के जगवले आहेत. ही संस्था सरकारी नियमानुसार रजिस्टर्ड असुन, 12A आणी 80 G  ह्या नियमावलीत समाविष्ट झालेली आहे. सर्वांनी वृक्षारोपण अभियानात आपल्या पवित्र श्रमदानासाठी उपस्थिती नोंदवावी असे आवाहन एक वृक्ष जिवनाचा अंजनापूर टीमने केले आहे.
                            दिनांक ८ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत वृक्षसेवक व वृक्षमित्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यानंतर ८ ते १० वाजेपर्यंत स्नेहालय प्रेरित अनामप्रेम निर्मित अंध व दिव्यांग कलाकारांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.






Monday 1 July 2019

निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाकडून मिळाला न्याय - ऍड. अजित काळे


शिर्डी लाईव्ह ( प्रतिनिधी) :-
                                        उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सर्वाधिक काळ याचिका चालून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ४८ वर्षाने उच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष अजित काळे यांनी तळेगाव दिघे येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
                                        निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विक्रांत काले व नानासाहेब जवरे यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करून सदर जनहित याचिकेत खंडपीठाने तीन मे रोजी अकोलेतील ० ते २८ कि. मी.चे काम चालू करण्याचे आदेश दिल्याने व त्याचे काम मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरु झाल्याने या याचिकेत महत्वाची भूमिका निभावणारे वकील अजित काळे यांचा कृती समितीच्या वतीने काल तळेगाव दिघे येथे माहेर मंगल कार्यालयात वाल्मीचे  प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार समारंभ व कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले हे होते.
                                        सदर प्रसंगी कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष विजय सपकाळ, वकील श्री देशमुख, दर्शन पोखरकर, पाहुणे पाटील, श्री कोरडे, बाळासाहेब पवार, श्री तारडे, तांदळे, अभिषेक हजारे, विजय पाटील, दत्ता पाटील, श्री वाकलेकर, संघटक नानासाहेब गाढवे, जेष्ठ नेते विजयचंद काले, शकुंतला काले, जयेंद्र काले, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, सचिव बाबासाहेब गव्हाणे, विठ्ठलराव पोकळे, माजी उपाध्यक्ष रमेश दिघे, गंगाधर रहाणे, कौसर सय्यद, अशोक गांडूळे, सोन्याबापू उऱ्हे सर, ज्ञानदेव शिंदे गुरुजी, तानाजी शिंदे, चंद्रकांत कार्ले, उत्तमराव जोंधळे, नवनाथ मोटे, विठ्ठलराव देशमुख, संदेश देशमुख, आबासाहेब देशमुख, नामदेव दिघे, भाऊसाहेब विलास गुळवे, बाळासाहेब शेळके, डी. एम.चौधरी, दिलीप खालकर, बाळासाहेब सोनवणे, कैलास गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, श्री ढमाले सर,शिवनाथ आहेर, विश्वनाथ थोरात, आदी प्रमुख मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
                              त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, निळवंडेचा लढा लढणे एवढे सोपे नव्हते, न्यायव्यवस्था पुराव्यावर चालते तेथे भावनेला मुळीच स्थान नसते. त्या बाबतीत पत्रकार नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी माहिती अधिकारात आम्हाला भरपूर पुरावे दिले.याआधीही न्यायिक अडचणी होत्या पूर्वीचे न्यायालयाचे आदेश बदलणे सोपे नसते. व ती प्रक्रिया पार करणे ही बाब अवघड होती मात्र पुरावे सक्षम असल्याने या बाबत न्यायालयाचे समाधान करता आले या प्रकल्पात पडद्याडचे हितशत्रू जास्त होते. त्यामुळे लढाई जोखमीची होती.जवळपास दोन डझनभर वकील विरुद्ध होते.मात्र या प्रकरणी निवडक पुरावे कामी आले.व अकोलेतील बंद केलेले कालवे सुरु करण्याचे आदेश ३ मे रोजी न्यायालयाने दिले.७.९३ कोटींचा प्रकल्प २३६९ कोटींवर गेला होता.या बाबत तर आपण अखेर सी.बी.आय.चौकशी साठी स्वतंत्र याचिका दाखल करण्याचा निर्णयाप्रत आलो होतो याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. शिर्डी कोपरगावला पाणी कमी नसताना पाणी मागितले गेले. मात्र त्यांची जलसंपदाकडे मागणीच नव्हती असे सांगून आगामी काळातही आपण कालवा कृती समितीच्या पाठीमागे ठाम उभे राहू असे आश्वासन दिले.
                              सदर प्रसंगी जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी पाणी हि मोठी संपत्ती आहे. त्यावरून आत्ताच लढाया चालू झाल्या आहेत. या पुढे निळवंडेचे पाणी वापरण्यासाठी सहकारी पाणी वाटप संस्था स्थापन कराव्या सुक्ष्म सिंचनयोजना राबवाव्या लागतील असा सावधानतेचा इशारा दिला.व महाराष्ट्र जल संपत्ती प्राधिकरण २००५ चा समन्यायी कायदा यांचा अभ्यास करावा लागेल. आता न्यायालये या संस्थांकडे पाठवत असल्याने आधी या संस्थांकडे न्याय मागावा लागेल.शेतकऱ्यांना शिबिरे आयोजित करवून पाणी वापराचे प्रशिक्षण द्यावे लागेल असेही शेवटी सांगितले.
                           सदर प्रसंगी कालवा कृती समितीच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी यांचाही सत्कार व सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यांचा सत्कार अड.शाम डांगे यांनी स्वीकारला.
                            सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक नानासाहेब जवरे यांनीं केले.उपस्थितांना रुपेंद्र काले, विजय सपकाळ, मच्छीन्द्र दिघे, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब रहाणे व गंगाधर रहाणे यांनी केले उपस्थितांचे आभार रमेश दिघे यांनी मानले.









Tuesday 25 June 2019

तळेगाव दिघेत कालवा कृती समितीचे वकील अजित काळे यांचा ३० जूनला सत्कार



जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे राहणार उपस्थित
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी)
                             उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे कालव्यांचे काम निळवंडे कालवा कृती समितीने ज्या वकिलांच्या मोफत विधी सेवेने मार्गी लावले ते विधिज्ञ अजित काळे यांचा सत्कार निळवंडे कालवा कृती समितीने तळेगाव दिघे येथे येत्या रविवार दि.३० जून रोजी सकाळी दहा वाजता माहेर मंगल कार्यालयात प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास लाभधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कालवा कृती समितीचे नेते रमेश दिघे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 
                             सदरचे सविस्तर वृत्त असे की, उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे कामास निधी मिळण्याचा मार्ग निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते  विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जाऊन विधिज्ञ अजित काळे यांच्या मार्फत जनहित याचिका क्रं.१३३-२०१६ अन्वये मोकळा केला असताना अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधीस पुढे करून उत्तरेतील काही राजकीय नेत्यांनी अकोले तालुक्यातील ० ते २८ की. मी. तील काम अवैधरित्या बंद करून दुष्काळी शेतकऱ्यांवर  अन्याय केला होता. त्या बाबत निळवंडे कालवा कृती समितीने सातत्याने आवाज उठवून जनतेला जागे करण्याचे काम केले होते. निळवंडे कालवा कृती समितीने अकोलेतील बंद काम चालू करण्यासाठी दीड वर्ष संघर्ष करून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाचे आदेश ३ मे ला मिळविले २७ मे रोजी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तळेगाव दिघे येथे कालवा कृती समीतीने २७ मे रोजी मोठे आंदोलन केले त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दहा जून हि अखेरची तारीख काम चालू करण्यासाठी दिली होती. नंतर १४ जून रोजी  औरंगाबाद खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने मागील तीन मे च्या आदेशाची अंमलबजावणी केली की नाही याची खातरजमा करत अकोलेतील कालव्यांचे काम सलग विना अडथळा सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. या सर्व प्रक्रियेत निळवंडे कालवा कृती समितीस औरंगाबाद उच्च न्यायालयाचे वकील संघाचे तत्कालीन अध्यक्ष अजित काळे यांचे मोफत विधी सहाय्य लाभले होते. त्यातून उतराई होण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय तळेगाव दिघे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत एकमुखाने केला आहे. त्यानुसार हा सत्कार कार्यक्रम संपन्न  होत आहे. या कार्यक्रमास १८२ गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश दिघे, कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे, पाटीलबा दिघे, डॉ.आर. पी.दिघे, भाऊसाहेब दिघे, उत्तमराव जोंधळे, दत्तात्रय आहेर, शिवनाथ आहेर, अशोक गांडूळे, विठ्ठलराव पोकळे, संतोष तारगे, चंद्रकांत कार्ले, विधिज्ञ योगेश खालकर, दिलीप खालकर, शिवाजी जाधव, बाळासाहेब सोनवणे, आबासाहे सोनवणे, दत्तात्रय चौधरी,आदिनी केले आहे.

चौकट-सदर कार्यक्रमात वकील अजित काळे यांना कालवा कृती समितीच्या वतीने "कृषिरत्न"या पुरस्काराने प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून त्यावेळी पुरंदरे यांचे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेस वळविण्याबाबत व्याख्यान संपन्न होणार आहे.



गोविंदगिरीजी महाराज यांचा आज पंधरावा पुण्यतिथी सोहळा



शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
                                   राहता तालुक्यातील पिंपळवाडी येथील परमपूज्य गुरुवर्य सिद्धयोगी गोविंदगिरीजी महाराज यांचा पंधरावा पुण्यतिथी सोहळा बुधवार दि.२६ जून रोजी अन्नपूर्णा पीठाधीश्वर श्रीश्री १००८  महामंडलेश्वर परमपूज्य स्वामी विश्वेश्वरानंद  गिरीजी महाराज अन्नपूर्णा आश्रम इंदौरत्रंबकेश्वर सिद्धाश्रम पिंपळवाडी व सर्व साधू संत महंतांच्याउपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. पंचक्रोशीतील उत्स्फूर्त सहकार्य करणारे भक्त पिंपळवाडी, शिर्डी, शिंगवे, वारी, कान्हेगाव, भोजडे, सडे, रुई, पुणतांबा, नपावाडी,  एकरुखे, रामपूरवाडी, राहाता येथील भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्तीत रहावे असे आवाहन पिंपळवाडी सिधाश्रमाचे मठाधिपती स्वामी नित्यानंद गिरीजी महाराज यांनी केले आहे .

Wednesday 12 June 2019

कासारे नंतर रांजणगावही सरसावले ! पुढा-यांना गावबंदी


निळवंडेचे कामात राजकीय खोडा, रांजणगावला पुढा-यांना गावबंदी
कासारे नंतर रांजणगावही सरसावले !
शिर्डी लाईव्ह(प्रतिनिधी) :-
                                   निळवंडे धरणाचे काम  पुर्ण झाले आसुन कालव्यांची कामे अपुर्ण आहेत. 182 गावांचा निळवंडे धरणाचे पाणी हा जिवन मरणाचा प्रश्न आहे. सातत्याने लाभधारक शेतकरी पाण्याची मागणी करत आहे. मात्र आश्वासनापलीकडे काही झालेच नाही. आता काम होण्याची चिन्हे दिसत आसतांना त्यालाही काहीजण अडचण निर्माण करत आहेत. आता कालव्यांची कामे तातडीने करुन लाभधारक शेतक-याच्या शेतात पाणी द्यावे अशी मागणी शेतक-यांची आहे.या प्रश्नासाठी संगमनेर तालुक्यातील कासारे यांनी यापुर्वीच पुढा-यांना गाव बंदी केली आहे. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथेही मंगळवारी विशेष ग्रामसभा घेऊन यापुढे सर्वच राजकिय पक्षांच्या पुढा-यांना  गावबंदी करण्याचा व येणा-या मतदानावर बहीष्कार टाकण्याचा
निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्वांनी गावात पुढा-यांना गावबंदी करुन मतदानावर बहीष्कारची व गावच्या निर्णयावर ठाम राहण्याची शपथ घेतली. रांजणगावात इतर गावांच्या पुढा-यांना याबात हस्तक्षेप न करु देण्याबरोबरच राजकिय पुढा-यांकडे कोणाही जाऊच नये असाही निर्णय घेण्यात आला.
                                  कासारे गावातील शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना वैतागून फेब्रुवारीत  सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी करून पहिली चपराक लगावली होती. त्याची दखल राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी दखल घेतली होती. आजही राज्य व देश पातळीवरील वृत्त वाहिन्या कासारे गावात ठाण मांडून आहेत. काम चालू करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाही त्यामुळे जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील तरुण शेतकरी अस्वस्थ होते त्यांनी २६ मे रोजी कोपरगावच्या  दुष्काळी दौऱ्यानिमित्त आलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधीस गावात येण्यास मज्जाव केला होता. त्यावेळीच ही नाराजी दिसून आली होती. त्यामुळे तरुण काहीतरी निर्णय घेण्याचा मानसिकतेपर्यंत आले होते. निळवंडे धरणावर या नेत्यांनी केवळ अनेक वर्षे फक्त राजकारणच केले गेले. काम अंतिम टप्यात असतांनाही यावर योग्य तोडगा निघत नाही त्यामुळे आता गावात पुढा-यांना गावबंदी करावी व येणा-या मतदानावरही बहीष्कार टाकावा असा निर्णय रांजणगाव देशमुखच्या विशेष ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. सर्वानी हनुमान मंदीरात शपथ घेऊन या निर्णयावर  शिक्कामोर्तब केले.
                                   यावेळी सरपंच संदिप रणधिर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, अॅड योगेश खालकर ,तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष वर्पे, प्रकाश गोर्डे, गजानन मते, अनिल खालकर, नानासाहेब वर्पे, धनंजय वर्पे, आत्याभाऊ वर्पे, शिवाजी वामन, विक्रम ठोबंरे, सुरेश देशमुख, कारभारी खालकर, दादासाहेब खालकर, प्रभाकर खालकर, रामभाऊ वर्पे, जालींदर खालकर, सुरेश खालकर, योगेश चव्हाण. भारत देशमुख, जयवंतराव खालकर, रामनाथ सहाणे, दत्तात्रय खालकर, विकास वर्पे, संजय खालकर, संपत खालकर, चंद्रभान खालकर, रंगनाथ वर्पे, विलास वर्पे, सोमनाथ खालकर, दिलीप खालकर, ज्ञानदेव चव्हाण आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Tuesday 11 June 2019

रांजणगाव देशमुख येथे साई करिअर अकॅडमी चे उदघाटन






शिर्डी लाइव्ह(प्रतिनिधी):-

                                कोपरगाव तालुक्यातील  रांजणगाव देशमुख सह परिसरात करिअर करण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांसाठी रांजणगांव देशमुख येथे साई करिअर अकॅडमी आज सुरू झाली आहे. या अकॅडमी चा उदघाटन सोहळा शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल कटके  या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकम पार पडला. यावेळी माजी पोलिस पाटील निवृत्ती गोर्डे, जवळकेचे सरपंच बाबूराव थोरात, रांजणगाव देशमुख सरपंच, उपसरपंच, सुनिल खालकर, रामनाथ बोऱ्हाडे, विनोद जवरे, दत्तु गोर्डे, युवराज गांजवे, संजय चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. या  अकॅडमी मध्ये कराटे वक्तृत्व, गायन, योगा, नेमबाजी आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Tuesday 28 May 2019

पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आ. कोल्हे यांच्या आधिका-यांना सुचना


धोंडेवाडी साठवण तलावाची आ..कोल्हे , तहसीलदार चंद्रे यांच्याकडून पाहणी 

शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):- 
                                       यावर्षीचा दुष्काळ फार मोठा आहे .पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहेतेंव्हा रांजणगांव देशमुख सहा गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या धोंडेवाडी साठवण तलावातील पाण्यांचे काटकसरींने नियोजन करावे.पाणी गळती याकडे लक्ष द्यावे. रांजणगांव देशमुख गावांसाठी टँकरद्वारे दोन एवजी पाच पाण्यांच्या खेपा करून त्याचा उदभव बदलुन द्यावा असा आदेश स्नेहलता कोल्हे यांनी तहसिलदार योगेश चंद्रे प्रभारी गटविकास अधिकारी पी. डी. वाघीरे यांना दिला.
आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शुक्रवारी धोंडेवाडी साठवण तलावास भेट देवुन पाहणी करून टंचाई आढावा बैठक घेतली.
                                     आ कोल्हे यावेळी बोलतांना म्हणांल्या की वीजेच्या थकबाकीमुळे विजपुरवठा बंद झालेला होता. या पाणीसाठवण योजनेचा वीज प्रवाह उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेशी चर्चा करुन सुरु करण्यात आला आहे.. गोदावरी कालव्यांच्या चालू पाटपाणी आर्वतनांत या साठवण तलावात पाणी घेतले तो पूर्ण क्षमतेने भरण्यांबाबत आपण संबंधीत अधिका-यांना सुचना केल्या होत्या पण पाणी कमी दिवस चालल्याने दोन मिटर पाणी साठा झाला आहे.
                                           यावेळी ग्रामस्थ आपले प्रश्न मांडतांना म्हणाले कि,जनावरांच्या पिण्यांच्या पाण्यांचा चा-याचा प्रश्न गंभीर आहे. जवाहर विहीर योजनेत 80 प्रस्ताव तयार आहे मात्र शासन अटीमुळे त्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत तो दुर करावा अशी मागणी केली. रांजणगांव देशमुख सह दहा गावांत 7 हजार 610 पशूधन असून त्यांच्या चा-यासाठी या परिसरात छावणी सुरू करावी तसेच पिण्यांच्या पाण्यांचे टँकरच्या खेपा अवघ्या दोनच होतात त्यामुळे जनावरांच्या पिण्याचे पाण्यांचे हाल होत आहे तेंव्हा टँकरखेपा वाढवाव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर तहसिलदार योगेश चंद्रे यांनी छावणी एवजी दोन दिवसांत सर्व्हेक्षण करून चारा डेपो सुरू करण्यांबाबत नियोजन करू. वडझरी ते रांजणगांव देशमुख हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे त्याच्या दुरूस्तीसाठी प्रयत्न करावेत. डाळींब पीकविमा, दुष्काळी अनूदान, सोयाबीन पीकविमा तात्काळ मिळावा अशा शेतक-यांनी मागण्या केल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर विहीर योजनेतील पैसे दोन वर्षापासून मिळत नाही ते मिळावे अशी लाभधारकांनी मागणी केली. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शेतक-यांच्या नागरिकांच्या तक्रारी ऐकुन घेत त्याच्या निरसनासाठी प्रयत्न करू असे सांगितले. याप्रसंगी सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष संजय होन, साईनाथ रोहमारे, संचालक अशोक औताडे,बाजार समितीचे संचालक नानासाहेब गव्हाणे,कैलास रहाणे, सरपंच विक्रम पाचोरे, उपसरंपच बाबासाहेब गोर्डे, निवृत्ती गोर्डे, विलास डांगे, सुखदेव खालकर, गजानन मते, ज्ञानदेव चव्हाणअभियंता उत्तम पवारभारत वर्पेशहाजी वर्पेकैलास गोर्डे रामनाथ सहाणेतुकाराम गव्हाणेविलास वामनसुरेश देशमुखबाळासाहेब काकडे आदि उपस्थित होते.
................................................................................................
बैठकितुनच आ.कोल्हे यांचा मंत्री जयकुमार रावल यांना फोन

महाराष्ट ग्रामिण रोजगार हमी योजनेचे शेतक-यांनी विहीरींचे प्रकरणे जास्त केली मात्र सरकारने उदिष्टे कमी दिल्याने ते उदिष्टे वाढवुन मिळावे म्हणजे जास्त शेतक-यांना याचा फायदा मिळेल अशी मागणी शेतक-यांनी टंचाई बैठकित आ केल्हे यांचेकडे केली असता त्यांनी बैठकीतुन मंत्री जयकुमार रावल यांचेशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करत उदिष्टे वाढवुन देण्याची विनंती केलीत्यांनी या आठवड्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत यावर चर्चा करुन शेतकरी हीताचा निर्णय घेण्याची ग्वाही आ.स्नेहलता कोल्हे यांना दिली.