रांजणगाव देशमुख सह सात गावांचा पाणी प्रश्न तात्पुरता मार्गी
आ. कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील रांजणगांव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयेगांव,
मनेगांव, अंजनापुर, बहादरपुर या सात गावांची असलेल्या प्रादेशिक पाणी
पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव पाण्यांने भरून घेण्यांसाठी थकीत
असलेल्या वीजबिलात आ. स्नेहलता कोल्हे यांनी तोडगा काढल्यानंतर एक्सप्रेस
फीडरवरील वीज जोड तात्काळ सुरू करावेत असे आदेश राज्य वीज वितरण कंपनीचे
कार्यकारी संचालक संजीवकुमार यांनी मंगळवारी दिले होते. त्याची तातडीने
अमलबजावनी होउन बुधवारी विजवितरण कंपनीच्या कर्मचा-यांनी दिवसभर काम करत
विज पुरवठा जोडुन दिला आणि धोंडेवाडीच्या साठवण तलावात पाच वाजेच्या
सुमारास पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना गेल्या दोन वर्षापासुन
बंद अवस्थेत होती.
रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे व्याजासह ३२ लाख रूपये वीज
बील थकले होते. वीजबील भरण्यासंदर्भात ग्रामपंचायती सक्षम नाही. या
गावामध्ये दुष्काळी परिस्थीती आहे. ही योजना चालु करावी यासाठी पाणीपुरवठा
मंत्री बबनराव लोणीकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राम
शिंदे तसेच महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यांच्याशी याबाबत
सातत्यांने पाठपुरावा केला तसेच कोल्हे कारखाना कार्यस्थळावर वीज वितरण
कंपनीचे कार्यकारी अभियंता डी बी गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी एन चावडा,
अतिरिक्त उप कार्यकारी अभियंता जे व्ही महाजन, उपकार्यकारी अभियंता जी आर
रिचवाल, पोलिस निरीक्षक श्री लोखंडे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे,
संबंधीत गांवचे रहिवासी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यांत आली त्यात सध्याची
दुष्काळी स्थिती नागरिकांसह जनावरांचा पिण्यांच्या पाण्यांचा निर्माण
झालेला प्रश्न त्यासाठी टँकर सुरू करण्यांवर होणारा खर्च याबाबत सविस्तर
चर्चा होवुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी बोलणे झाले. आणी
विजपुरवठा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
चालु आवर्तनातुन हा तलाव पुर्ण क्षमतेने भरुन घेणे गरजेचे आहे. हा तलाव
पुर्ण क्षमतेने भरला तर तिन ते चार महीने या योजनेच्या गावठाण हद्दीतील
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागु शकेल.
पाणी पडतेवेळी बहादरपरचे माजी सरपंच कैलास रहाणे, रांजणगावचे सरपंच संदीप
रणधीर, रांजणगाव देशमुख चे ग्रामविकास अधिकारी शेख व इतर गावचे ग्रामसेवक व
विजवितरण कंपनीचे आधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
या
साठवण तलावात पाणी साठा केल्यानंतर प्रशासनास मोठी काळजी घ्यावी लागणार
आहे. आसपास पाणी उपसा होणार नाही यावर कडक नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तरच
तलावात पाणी टिकून लाभार्थी गावांना त्याचा फायदा होईल.
(या
तालावात पाणी साठल्यास या योजनेच्या लाभार्थी गावांना याचा फायदा होणार
आहे. आ.स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने तलावात पाणी आले
आहे.
-संदीप रणधीर, सरपंच रांजणगाव देशमुख)