रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
प्रत्येक गाव समृध्द झाले पाहीजे.त्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकरी हीताचे निर्णय होत आहे.शेतक-यांच्या प्रश्नासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे.ज्यांना
कामच करायचे नाही अशी टिका करण्यात धन्याता मानतात पण मला अनेक कामे
मार्गी लावता आली व अजुनही अनेक कामे मार्गी लावणार आहे असल्याचे प्रतिपादन
आ.स्नेहलता कोल्हे यांनी केले
त्या कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे चौदावा वित्त आयोग व जनसुविधा योजनेअंतर्गत बांदण्यात येणा-या 14 लाख रुपये खर्चाच्या ग्रामपंचायत इमारतीच्या भुमीपुजन प्रसंगी बोलत होत्या अध्य़क्षस्थानी निवृत्ती गोर्डे होते.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद शोरात,युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे,साईनाथ रोहमारे,बापुसाहेब औताडे,कैलास रहाणे,विक्रम पाचोरे,सरपंच संदिप रणधिर,उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, पोलीस पाटील राजेंद्र शेटे आदि प्रमुख यावेळी उपस्थीत होते. यावेळी दलीतवस्ती स्मशानभुमीतील शेडचे भुमीपुजनही करण्याता आले.
यावेळी बोलतांना आ.कोल्हे पुढे म्हणाल्या की,मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित होते.सातत्याने पाठपुरावा करुन ही प्रश्न मार्गी लागत आहे.या परिसरातील पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी लवकरच बैठक घेणार आहे.निळवंडे
धरणाच्या बाबतीत काही जण ज्यांना या कामाचे काही देणेघेणे अशी मंडळी
लोकामध्ये चुकीची माहीती सांगत आहे मात्र निळवंडेच्या या भागातील पाण्याला
कोणताही धक्का लागणार नाही.शेतक-यांची प्रश्न सरकारकडुन सोडवुन घ्यावे लागतात त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो.शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहचल्या पाहीजे हे काम आम्ही करत आहोत.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण, वाल्मीक कांडेकर, विस्तार आधिकारी माळी, ग्रामविकास आधिकारी शेख, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गोर्डे, सचिन खालकर, रामनाथ सहाणे, भाउसाहेब खालकर, रावसाहेब गोर्डे, भारत वर्पे, त्र्यंबक वर्पे, अरुण वर्पे, हरीभाउ गुडघे, सुभान संय्यद ,अशोक विघे, सुभाष वर्पे, तुषार काथे आदिसह ग्रामस्थ उपस्थीत होते. प्रास्ताविक सरपंच संदिप रणधिर यांनी केले.सुत्रसंचालन व आभार रावासाहेब गोर्डे यांनी मानले.
..............................
.............
फोटोओळी- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे ग्रामपंचायत इमारतीचे भुमीपुजनाप्रसंगी आ.स्नेहलता कोल्हे, शरद थोरात,साईनाथ रोहमारे व ग्रामस्थ.