Saturday 9 August 2014

रांजणगाव देशमुख पथकर नाक्यावरील दुभाजकामुळे अनेक अपघात
अनेकांना शारीरिक अपंगत्व ; प्रशासनाचे दुर्लक्ष
रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
                                    कोपरगाव - संगमनेर रस्त्यावर रांजणगाव देशमुख येथे बंद असलेल्या टोलनाक्याच्या  दुभाजकामुळे अनेक अपघात होत असून  यामुळे अनेक लोकांना शारीरिक अपंगत्व आले आहे.
                                     कोपरगाव- संगमनेर रस्त्यावर  झगडेफाटा  ते वडगाव फाटा हा रस्ता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा याअंतर्गत  बांधलेला असून हा रस्ता खराब झाल्यामुळे स्थानिकांच्या आंदोलनामुळे काही महिन्यांपूर्वी हा  पथकर नाका बंद करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने पथकर नाक्यांसंधर्भात काढलेल्या अध्यादेशानुसार हा पथकर नाका कायमचा बंद करण्यात आला आहे. तरीही येथील पत्र्याचे शेड व  रत्याच्या  मध्ये असलेले संगणक कक्ष व दुभाजक अजूनपर्यंत काढलेले नसून  येथील विद्युत दिवेही रात्रीच्या वेळेस कायम बंद असतात.  या रस्त्याने खूप मोठ्या प्रमाणात अवजड व विविध प्रकारची वाहतूक सुरु असून  वाहनांना या पथकर नाक्यावर आल्यानंतर रात्रीच्या वेळेस येथील दुभाजकाचा अंदाज येत नसल्यामुळे वाहने यावर धडकून येथे अपघात होत आहेत विशेषता कार व मोटारसायकल यांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत असून या अपघातात अनेकांन शारीरिक अपंगत्व आले असून  व वाहनांचेहि नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.  या ठिकानी  उभे केलेले पत्र्याचे शेड व रस्त्याच्या मध्ये असलेले संगणक कक्ष आणि  रस्त्यातील दुभाजक लवकरात लवकर काढणे गरजेचे आहे पण  प्रशासनाचे याकडे लक्ष नसून हे  दुभाजक वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहेत.
                                     येथे  अपघात होऊन कोणाचा जीव जाण्याच्या आत प्रशासनाने यात वेळेवर लक्ष घालून या ठिकानी  उभे केलेले पत्र्याचे शेड व रस्त्याच्या मध्ये असलेले संगणक कक्ष आणि  रस्त्यातील दुभाजक काढून  प्रवाशांच्या जीवाशी खेळणे बंद करावे अशी मागणी वाहधाराकांकडून होत आहे.

काही दिवसांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे.   हे काम अतिशय निकृष्ट प्रकारे करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या निकृष्ट कामाची बिले काढली जात आहेत.
दुखः पेलण्याची शक्ती भगवंतच देतो - ढोक महाराज
रांजणगाव  देशमुख (वार्ताहर):-
                                    परमार्थ हा माणसाला दुखातून सावरण्याची शक्ती देतो म्हणून माणसाने दुखात खचून  न जाता महापुरुषांच्या जीवनाकडे बघायला हवे व त्या दुखाचा सामना करायला हवा असे ह भ प  रामराव महाराज  ढोक यांनी सांगितले.
                                   कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या काळात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या  काल्याच्या कीर्तानाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी परिसरातील भाविक हजारोंच्या संखेने उपस्थित होते. ढोक महाराज पुढे  म्हणाले कि भगवान श्रीकृष्णाने गोकुळात जे  काम केले त्याचे उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचे असते. कृष्णाने पांडवांवर जीवापाड प्रेम केले. महारांजानी यावेळी हरिचंद्र व तारामती यांचे उदाहरण देऊन  समजावले कि हरिचंदराने स्वप्नात दिलेले वचन सत्यात पूर्ण  केले त्यांच्या जीवनातही खूप  दुखे आली पण त्यांनी खचून न जात त्या दुखांचा सामना केला. महाराज म्हणाले कि, सूर्यास्तानंतर सूर्योदय हा  होणारच असतो त्याचप्रमाणे दुखः नंतर सुख हे येणारच असते. महाराजांनी आई वडिलांचे प्रेम समजावताना सांगितले कि आई मुलावर जेवढे प्रेम करते तेवढेच प्रेम बापही मुलावर करतो. ज्योत आई आहे तर  बाप समयी आहे.  रांजणगावचे  ऐक्य खूप मोठे असून ते चिरंतन असेच रहावे असे महाराजांनी या वेळेस सांगितले.  ढोक महाराज गेल्या  ३२ वर्षापासून रांजणगावात येत आहेत. त्यामुळे गावाशी त्यांचे कौटुंबिक संबंध झालेले आहेत. सकाळी ४ वाजता काकड आरती होऊन ९ ते ११ कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी ४ वाजता दिंडीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या वेळी  परिसरातील भाविक हजारोंच्या संखेने उपस्थित होते.

Monday 23 June 2014

शिर्डी विमानतळावर चोरट्यांचा सुळसुळाट
सिमेंट, लोखंडी एंगल, सुरक्षा तार, हजारो लिटर डिजलची होतेय चोरी
  शिर्डी(प्रतिनिधी):-
                                      शिर्डी देवस्थानासाठी उभारण्यात आलेल्या काकडी विमानतळावरून येत्या काही दिवसात विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असताना रात्रीच्या वेळेस येथे खूप मोठ्या प्रमाणावर चोर्या होत आहेत  रात्रीतून हजारो रुपयांच्या ऐवजाची चोरी होत असून विमानतळ उभारणार्या वसिष्ठ कंपनीसमोर याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
                                       कोपरगाव तालुक्यात काकडी येथे सुरु होत असलेले विमानतळ अंतिम टप्यात असून या विमानतळाचे काम वसिष्ठ प्रोजेक्ट या कंपनीला देण्यात आलेले आहे. रण वे, टर्मिनल इमारत,  रस्ते,  हि महत्वाची  कामे पूर्ण झाली असून  संरक्षक भिंत व काही किरकोळ स्वरूपाची कामे सुरु आहेत. या दरम्यान रात्री  येथे खूप मोठ्या स्वरूपात चोर्या होत आहे असे वसिष्ठ कंपनीचे व्यवस्थापक श्री. व्यंकटेश्वरा यांनी सांगितले.  विमानतळाचा परिसर खूप मोठा असल्याने येथे चोर्यांचे प्रमाण वाढत आहे. येथे टर्मिनल इमारतीचे काम सुरु असताना हि इमारात विमानतळाच्या  बाजूला असल्याने एकाच वेळी  येथून ७० गोण्या सिमेंटची चोरी झाली आहे. बाजारभावाप्रमाणे याची किमत २१ हजार रुपये आहे. येथे संरक्षक भिंतीचे काम सुरु असून यासाठी  लोखंडी एंगल  व तारा वापरण्यात येत आहेत  रोज रात्री या एंगल व तारांची चोरी होत आहे. विमानतळाच्या कामासाठी खूप मोठ्या प्रमाणात डीजल लागत असून एकाच वेळेस २० हजार लिटर डिजल आणले जाते व प्रकल्पातील मोठ्या टाकीमध्ये टाकले जाते रात्रीच्या वेळेस या टाकीचे फिल्टर खोलून या टाकीतून लाखो रुपयांच्या हजारो लिटर डिजलची चोरी केली जात आहे. या चोर्यांमुळे विमानतळ कंपनी त्रस्त झाली असून या घटनेमध्ये वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या ठिकाणी वसिष्ठ कंपनीच्या लाखो रुपयांच्या मशनरि  उभारलेल्या असून या सर्व माशानारीना सुरक्षा रक्षक नेमने अशक्य आहे. याच कंपनीला काकडी विमानतळ ते शिर्डी हा रस्ता बनवण्याचे  काम मिळाले असल्याने अनेक  नवीन मशनरी येथे आणल्या गेल्या आहेत. या मशनरिना  देखील मोठा धोका असून चोरटे यांचे देखील नुकसान करू शकतात अशी भिती कंपनीला वाटू लागली आहे. या सर्व घटनांची शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे असे श्री. व्यंकटेश्वरा यांनी सांगितले. या सर्व परिस्थितीमध्ये प्रशासनाने विशेष लक्ष घालून  या चोर्यांना लवकरात लवकर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे  मात्र ज्या गावात विमानतळ होत आहे त्या काकडी गावात अजुनपर्यंत कोणत्याही पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्यात आलेले नाही. अनेक मुलभूत  सुविधांपासून हे गाव वंचीत आहे.