ज्ञानेश्वरी चौगुले यांच्या रसाळ वाणीतून भागवत कथेचे विवेचन
शिर्डी लाईव्ह (प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे शुक्रवार दिनांक १२ एप्रिल ते शुक्रवार
दिनांक १९ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्तह व संगीत श्रीमदभागवत कथा
सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून बबन महाराज गव्हाणे, बबन महाराज गाडेकर,
रामप्रभू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह होत आहे. भागवतवासी
ज्ञानेश्वरी चौगुले या आपल्या रसाळ वाणीतून श्रीमदभागवत कथा सांगणार आहेत.
सात दिवस दररोज सायंकाळी ६
ते ९ या वेळेत संगीत
श्रीमदभागवत कथा होणार असून पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १०
ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ होणार आहे. आज शुक्रवार दिनांक
१२ रोजी
श्रीमदभागवत गोकर्ण आख्यान, शनिवार दिनांक १३ रोजी नारद पूर्व चरित्र,
परिक्षितिशाप, शुकदेवाचे आगमन, रविवार दिणक १४ रोजी श्रुष्टीवर्णन, सती
चरित्र, ध्रुव चरित्र, सोमवार दिनांक १५ रोजी जडभरत चरित्र, प्रल्हाद
चरित्र, समुद्र मंथन, रामजन्म, मंगळवार दिनांक १६ रोजी श्रीकृष्ण बाललीला,
गोवर्धन पूजा, बुधवार दिनांक १७ रोजी श्रीकृष्ण मथुरा आगमन, कंसवध,
श्रीकृष्ण रुख्मिणी स्वयंवर, गुरुवार दिनांक १८ रोजी सुदाम चरित्र
परिक्षितीमोक्ष, कथा फलश्रुती अशी कार्यक्रमाची रूपरेषा असून दररोज कथेनंतर
महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शुक्रवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता श्रीमदभागवत ग्रंथ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे व
श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरूळ येथून युवकांनी आणलेल्या ज्योतीची मिरवणूक
काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत मीराताई महाराज
गोपाळे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम
होणार आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन
अंजनापूरच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.