Tuesday, 28 May 2019

पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आ. कोल्हे यांच्या आधिका-यांना सुचना


धोंडेवाडी साठवण तलावाची आ..कोल्हे , तहसीलदार चंद्रे यांच्याकडून पाहणी 

शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):- 
                                       यावर्षीचा दुष्काळ फार मोठा आहे .पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहेतेंव्हा रांजणगांव देशमुख सहा गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या धोंडेवाडी साठवण तलावातील पाण्यांचे काटकसरींने नियोजन करावे.पाणी गळती याकडे लक्ष द्यावे. रांजणगांव देशमुख गावांसाठी टँकरद्वारे दोन एवजी पाच पाण्यांच्या खेपा करून त्याचा उदभव बदलुन द्यावा असा आदेश स्नेहलता कोल्हे यांनी तहसिलदार योगेश चंद्रे प्रभारी गटविकास अधिकारी पी. डी. वाघीरे यांना दिला.
आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शुक्रवारी धोंडेवाडी साठवण तलावास भेट देवुन पाहणी करून टंचाई आढावा बैठक घेतली.
                                     आ कोल्हे यावेळी बोलतांना म्हणांल्या की वीजेच्या थकबाकीमुळे विजपुरवठा बंद झालेला होता. या पाणीसाठवण योजनेचा वीज प्रवाह उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेशी चर्चा करुन सुरु करण्यात आला आहे.. गोदावरी कालव्यांच्या चालू पाटपाणी आर्वतनांत या साठवण तलावात पाणी घेतले तो पूर्ण क्षमतेने भरण्यांबाबत आपण संबंधीत अधिका-यांना सुचना केल्या होत्या पण पाणी कमी दिवस चालल्याने दोन मिटर पाणी साठा झाला आहे.
                                           यावेळी ग्रामस्थ आपले प्रश्न मांडतांना म्हणाले कि,जनावरांच्या पिण्यांच्या पाण्यांचा चा-याचा प्रश्न गंभीर आहे. जवाहर विहीर योजनेत 80 प्रस्ताव तयार आहे मात्र शासन अटीमुळे त्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत तो दुर करावा अशी मागणी केली. रांजणगांव देशमुख सह दहा गावांत 7 हजार 610 पशूधन असून त्यांच्या चा-यासाठी या परिसरात छावणी सुरू करावी तसेच पिण्यांच्या पाण्यांचे टँकरच्या खेपा अवघ्या दोनच होतात त्यामुळे जनावरांच्या पिण्याचे पाण्यांचे हाल होत आहे तेंव्हा टँकरखेपा वाढवाव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर तहसिलदार योगेश चंद्रे यांनी छावणी एवजी दोन दिवसांत सर्व्हेक्षण करून चारा डेपो सुरू करण्यांबाबत नियोजन करू. वडझरी ते रांजणगांव देशमुख हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे त्याच्या दुरूस्तीसाठी प्रयत्न करावेत. डाळींब पीकविमा, दुष्काळी अनूदान, सोयाबीन पीकविमा तात्काळ मिळावा अशा शेतक-यांनी मागण्या केल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर विहीर योजनेतील पैसे दोन वर्षापासून मिळत नाही ते मिळावे अशी लाभधारकांनी मागणी केली. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शेतक-यांच्या नागरिकांच्या तक्रारी ऐकुन घेत त्याच्या निरसनासाठी प्रयत्न करू असे सांगितले. याप्रसंगी सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष संजय होन, साईनाथ रोहमारे, संचालक अशोक औताडे,बाजार समितीचे संचालक नानासाहेब गव्हाणे,कैलास रहाणे, सरपंच विक्रम पाचोरे, उपसरंपच बाबासाहेब गोर्डे, निवृत्ती गोर्डे, विलास डांगे, सुखदेव खालकर, गजानन मते, ज्ञानदेव चव्हाणअभियंता उत्तम पवारभारत वर्पेशहाजी वर्पेकैलास गोर्डे रामनाथ सहाणेतुकाराम गव्हाणेविलास वामनसुरेश देशमुखबाळासाहेब काकडे आदि उपस्थित होते.
................................................................................................
बैठकितुनच आ.कोल्हे यांचा मंत्री जयकुमार रावल यांना फोन

महाराष्ट ग्रामिण रोजगार हमी योजनेचे शेतक-यांनी विहीरींचे प्रकरणे जास्त केली मात्र सरकारने उदिष्टे कमी दिल्याने ते उदिष्टे वाढवुन मिळावे म्हणजे जास्त शेतक-यांना याचा फायदा मिळेल अशी मागणी शेतक-यांनी टंचाई बैठकित आ केल्हे यांचेकडे केली असता त्यांनी बैठकीतुन मंत्री जयकुमार रावल यांचेशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करत उदिष्टे वाढवुन देण्याची विनंती केलीत्यांनी या आठवड्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत यावर चर्चा करुन शेतकरी हीताचा निर्णय घेण्याची ग्वाही आ.स्नेहलता कोल्हे यांना दिली.

No comments:

Post a Comment