रांजणगावात अडीच तास रस्ता रोको अंदोलन
लहान मुलींच्या हस्ते दिले निवेदन
रांजणगाव देशमुख (प्रतिनिधी)-
रांजणगाव देशमुख व परिसरातील ११ गावात ५० पैसापेक्षा कमी आणेवारी असतानाही ही गावे दुष्काळात बसलेली नाही. त्याविरोधात रांजणगाव देशमुख येथे सर्वपक्षीय रास्ता- रोको आंदोलन करण्यात आले. हा प्रश्न मार्गी लागला नाही तर १४ व १५ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करून १६ तारखेपासून चिता रचून आमरण उपोषण केले जाणार आहे. त्याही पुढे जाऊन १९ पर्यंत मार्ग निघाला नाही तर चिता पेटवली जाणार असल्याचा निर्णय वेळी शेतकऱ्यांनी घेतला. सकाळी नऊ वाजता सुरू झालेले आंदोलन तब्बल अडीच तास चालले. यावेळी रास्त्याच्या दोन्ही बाजूने दोन कि.मी. पर्यंत रांगा लागल्या होत्या. दरम्यान लहान मुलींचे हस्ते आंदोलनाचे निवदेन देत कोपरगावचे तहसिलदार किशोर कदम यांना देण्यात आले.
दुष्काळाच्या सर्व निकषात ही गावे बसतात परंतु पोहेगाव मंडळामुळे सरासरी कमी येत असल्याने शासनाच्या दुष्काळाच्या यादीतून ही गावे वगळण्यात आली आहे. या सर्वाचा रोष यावेळी आंदोलनातून पाहायला मिळाला. सकाळी आंदोलन जेव्हा सुरू झाले तेव्हा आंदोलनाचे निवेदन घेण्यासाठी तहसिलदार हजर नसून त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे कळाल्यावर आंदोलक संतप्त झाले. मंडलाधिकारी जेठगुले यांनी तहसिलदार हे दिल्लीला बैठकीसाठी गेले असल्याचे आंदोलकांना सांगितले. यावेळी जो पर्यंत सक्षम अधिकारी येत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. तहसिलदार नसेल तर प्रातांधिका-यांना बोलवा अशी भूमिका यावेळी घेतली. आंदोलन सक्षम आधिका-याशिवाय सुटणार नसल्याचे लक्षात येताच तहसिलदार स्वतः हजर झाले
यावेळी आंदोलक आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, अकरा गावात दुष्काळी परिस्थिती असतानाही दुष्काळ जाहीर झाला नाही, त्याला प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाने या गावात पर्जण्यमापक न बसविता ते गोदावरी काठी बसविले आहे. या गावांचा स्वतंत्र प्रस्ताव दाखल करुन तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, तसेच प्रत्येक गावात टँकर, चारा छावण्या व दुष्काळी निधीसाठी तरतुद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान आंदोलनावेळी रूग्णवाहिका आल्यानंतर सर्व आंदोलकांनी तातडीने तिला जागा करून दिली.
यावेळी शिर्डीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला. नायब तहसीलदार बी.जी गोसावी, मंडलाधिकारी बी.के.जेडगुले आदि उपस्थीत होते।
..............................
आंदोलनाचे निवेदन देताना शेतकऱ्यांची तहसिलदार कदम यांना रास्ता रोकोचे निवेदन गावातील लहान मुलींच्या हस्ते देण्यात आले.
तहसिलदार जर दिल्लीला गेले होते तात्काळ ते कोणत्या विमानाने आले असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी केला. म्हणजे प्रशासन चुकीची माहिती सांगून आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न होता की काय असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थितीत केला.
..............................
रांजणगावसह ११ गावात दुष्काळ जाहीर करावा यासाठी केलेल्या रास्ता रोकोचे निवेदन देताना तहसिलदार किशोर कदम यांना देताना लहान मुली.
रांजणगावसह ११ गावात दुष्काळ जाहीर करावा यासाठी केलेल्या रास्ता रोकोसाठी उपस्थितीत शेतकरी।




No comments:
Post a Comment