Wednesday, 4 July 2018

विद्यार्थ्यांचे ध्येय मोठे असावे- शिवाजी रहाणे ; बहाद्दरपूर येथे गुणवंतांचा सत्कार ; २८ वर्षांपासून सुरु असलेला उपक्रम



रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
विद्यार्थ्यांचे ध्येय मोठे असावे प्रत्येकाने मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न ठेवावे व विद्यार्थ्यांचा गुणगौरव केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन शिवसेनेचे मलबार मुंबईचे उपविभाग प्रमुख शिवाजी रहाणे यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील श्री.छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठान व बहादरपूर ग्रामस्त आयोजित २८ व्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मोफत वह्या वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत होते.
बालउत्साही मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने कै. दशरथ रहाणे त्यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या या गुणगौरव व वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमात दरवर्षी विद्यार्थ्यांना विनामूल्य वह्यांचे वाटप, विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते रामदास रहाणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन मुबई दक्षिण शिवसेना विभाग प्रमुख शिवाजी राजे रहाणे होते. तसेच कोपरगावचे शिवसेनेचे नेते राजाभाऊ झावरे, नितिन औताडे, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब सावळेराम रहाणे, उद्योजक संदीप गाढे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख असलम शेख, जयंवत गडाख, वेसचे प्रथम लोकनियुक्त सरपंच माणिकराव दिघे, मिंनानाथ हेंगडे, शिवसेना युवा नेते सागर आण्णा रहाणे, जयवंत भुईटे, अंजनापूरचे सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, प्रकाश खामकर, लक्ष्मण दादा थोरात आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी रहाणे पुढे म्हणाले की, राजकारणातून १०० टक्के समाजसेवा करत असून गेल्या २८ वर्षांपासून या कार्यक्रमासाठी ग्रामस्तांनीही भरपूर सहकार्य केले आहे.
या वेळी विशेष नैपुण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्याक्रामाच्या वेळी साईनाथ रहाणे, विलास पाडेकर, भाऊसाहेब शिंदे, भास्कर महाराज गव्हाणे, मिंनानाथ जोंधळे, आर.टी.वो अधिकारी प्रविण रहाणे, विक्रीकर आयुक्त सागर जोंधळे, बाळासाहेब चिमणराव रहाणे, गंगाधर रहाणे, माजी सरपंच कैलास रहाणे, आदी प्रमुख मान्यवर तसेच ग्रामस्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत रहाणे व महेश रहाणे तर आभार रामदास रहाणे यांनी मानले.
विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवर. छाया- विकास गोर्डे

No comments:

Post a Comment