लहान मुलांना आपण स्वप्न द्यायला हवे त्याने त्यांचा विकास होतो आणि पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल होते आणि गावही आदर्श होते असे प्रतिपादन स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे तीन दिवसापासून सुरु असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयवंतराव गडाख, नेवासा तालुक्यातील गोगलगाव चे सरपंच योगेश म्हस्के, वडगाव चे सरपंच वाबळे, एच डी एफ सी बँक व कृषिविकास संस्थेच्या रेखा चिकणे, जीवन खरात, रोहित बिडवे, नानासाहेब गव्हाणे, प्रल्हाद गाडे, बापूसाहेब गव्हाणे, संदीप गाडे, बाबासाहेब गव्हाणे, आदि मान्यवर उपस्थित होते.
अंजनापूर येथे वृक्षवेध फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आली असून या फाउंडेशन च्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून मोठ्या प्रमानात वृक्षारोपण करण्यात येते. यावर्षी ६५१ वृक्षांचे रोपण करण्यात आले असून त्यांना सुरक्षा जाळीही लावण्यात आली आहे. त्यामुळे एकूण लागवड केलेल्या झाडांची संख्या २०२३ झाली आहे.
डॉ. गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले की, १० वर्षानंतर या गावाचे स्वरूप खूप वेगळे राहील. त्याचे एक स्वप्न चित्र आपण एका भिंतीवर रेखाटले पाहिजे आणि त्यावर काम केले पाहिजे.
तसेच जयवंत गडाख आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अंजनापूर गावाचे काम वाखाणण्याजोगे आहे पुढील काही वर्षात देश पातळीवर याची नोंद होईल. आणि राळेगण सिद्धी व हिवरे बाजार प्रमाणे लोक आपल्याकडे प्रेरणा घेण्यासाठी येतील.
सदर प्रसंगी वर्षभर गावातील युवक झाडांची निगा राखतात त्यांची काळजी घेतात अशा युवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जयवंत गडाख, योगेश म्हस्के, बापूसाहेब गव्हाणे, संदीप गाढे, रामदास गव्हाणे, सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी गावातील ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब रहाणे यांनी आपल्या विशेष वत्कृत्व शैलीतून केले तर आभार कैलास गव्हाणे यांनी मानले.
(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे तीन दिवस सुरु असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा समारोप डॉ. गिरीश कुलकर्णी व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी युवकांचा सन्मान करण्यात आला. छाया- विकास गोर्डे)


No comments:
Post a Comment