Wednesday, 18 July 2018

अटल विश्वकर्मा योजनेची सुरुवात कोपरगाव मधून ; आ. कोल्हे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कामगार नोंदणीचे आवाहन


रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागा कडून राबवण्यात आलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामगारांची नोंदणी करण्यात आली. या अभियानाची सुरुवात जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातून प्रथम करण्यात आली. नोंदणी केलेल्या कामगारांना आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पाच हजार रुपयांचा धनादेश व कामगारांच्या मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
शासनाच्या या मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी २८ विविध कल्याणकारी योजना रावबिल्या जातात. मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे १८ ते ६० या वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांच्या नावनोंदणी करिता मंडळातर्फे दि ४ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात अभियान राबवण्यात आले.
यावेळी कोपरगाव तालुक्यात आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते नोंदणी केलेल्या कामगारांना पाच हजार रुपयांचा धनादेश व कामगारांच्या मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी नाशिकचे कामगार अधिकारी श्री. जाधव, अहमदनगर चे कामगार अधिकारी श्री. सादिक, भाजपचे तालुका अध्यक्ष शरद थोरात, कोपरगाव चे कामगार अधिकारी मेंगाणे, कोपरगाव बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, उपाध्यक्ष सादिक पठाण, सचिव सुधाकर क्षीरसागर. खजिनदार शब्बीर शेख, हरिभाऊ लोहाकणे, सोमेश कायस्थ, नारायण गवळी आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- अटल विश्वकर्मा योजनेंतर्गत कामगार नोंदणी अभियानाची सुरुवात जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात प्रथम झाली. यावेळी नोंदणी केलेल्या कामगारांना पाच हजार रुपयांचा धनादेश व त्यांच्या मुलांना पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले. )

No comments:

Post a Comment