Tuesday, 17 May 2016

गुरु प्रसिद्ध असन्यापेक्षा सिद्ध असावा - उमेश महाराज दशरथे  
रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
                        भक्ती नाही करता आली तरी चालेल मात्र नको त्याला संत किंवा देव म्हटल्यामुळे जीवनात जास्त नुकसान होते आपला गुरु सिध्द असल्यापेक्षा प्रसिध्द आहे का हे बघण्याकडेच आज समाजाचा कल दिसतो पण गुरु प्रसिद्ध असण्यापेक्षा सिद्ध असावा असे प्रतिपादन हभप उमेश महाराज दशरथे यांनी केले. 
                        कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे सुरु असलेल्या श्री संत सदगुरु गोपाजीबाबांच्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताहाचे सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.यावेळी  भागवताचार्य केशव महाराज उखळीकर, किर्तनकेसरी पांडुरंगगिरी महाराज वावीकर, वैराग्यमुर्ती बबन महाराज गाडेकर, रामप्रभु महाराज आदिसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. .गेल्या सात दिवसापासुन सुरु असलेल्या भागवत कथेला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असुन उखळीकर महारांजानी भाविकांना भक्तीरसात न्हाउ घातले. सर्व भाविक नाचु ,गाउ लागले.अनेकांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. श्रीकृष्णाचे जीवन चरीत्र अत्यंत रसाळ वाणीतुन सादर केले.
                         दशरथे महाराज पुढे म्हणाले कि, जगातील निराभिमानी लोक देवाला आवडतात. देवाचे चिंतन सदैव करणारांचा योग-क्षेम भगवंत वाहतो. अनन्य भावाने शरण गेल्यानंतर त्याचे जीवन निश्चित सफल होते. भक्ताने देवावरची आपली आवड फक्त शब्दात व्यक्त करु नये ती कृतीमध्ये आणावी. मार्गदर्शक आणि अंमलबजावणी करणारे यांचा समन्वय सुंदर असला की कार्य संदर होते.संत परमेश्वराची ओळख सामान्य माणसाला लक्षणे,चरीत्र आणि महिमा यावरुन  करुन देतात. देवाच्या दर्शनापेक्षा त्याची ओळख होणे गरजेचे आहे. दुर्योधनाला देवाचे दर्शन सतत झाले मात्र ओळख झाली नाही. देवाचे चरीत्र आनंद देते तर संताचे चरित्र अनुभव देते. देवाचा स्नेह होण्यापेक्षा कृपा व्हावी .परमेश्वराची कृपा अंडज, जरज,स्वेदज, उदबीज या सर्वांवर झालेली आहे. जीवनात वाट लावणारे भेटतात मात्र वाटेला लावणारे थोडे भेटतात. असेही त्यनी सांगितले. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. 



फोटोओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे सुरु असलेल्या  अखंड हरीनाम सप्ताहाचे सहावे पुष्प गुंफतांना उमेश महाराज दशरथे व समोर उपस्थीत असलेले प्रचंड भाविक. (छाया-विकास गोर्डे)

No comments:

Post a Comment