Tuesday, 17 May 2016

बहादरपूर हे बेटाशी निष्ठा असणारे गाव- महंत रामगिरी 
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
                                   बहादरपूर हे सरला बेटाशी निष्ठा असणारे  गाव असून गोपाजी बाबा हे महान संत होते. आजचा दिवस सर्वांच्या भाग्याचा आहे असे प्रतिपादन सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले. 
                                    कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे श्री संत सदगुरु गोपाजी बाबांचा सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी हभप मधुकर महाराज, हभप चंद्रकांत सावंत आदि  महाराज उपस्थित होते. रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, तपस्यायुक्त, भगवतमय व त्यागमय बाबांचे जीवन आहे. येथे आल्यानंतर दुष्काळ वाटत नाही परामार्थामुळे दुखाची तीव्रता अन्तकरनापर्यन्त जाणार नाही. अनुकालाता व प्रतिकुलता यामध्ये समानता आणण्याची शक्ती परमार्थात आहे. भगवदचिन्तनाने समाधान प्राप्त होते. याचा आनंद आपणा सर्वांच्या चेहर्यावर दिसत आहे . गोपाजी बाबांनी येथे साधना केलेली आहे. साधनेचे एक वलय असते. बाबांचे संस्कार या ठिकाणी आहे. येथे उर्जा आहे. ती सर्वाना पोषक आहे.येथे भागवत कथा सुरु आहे. भागवत कथा म्हणजे वेदरूपी कल्परुक्षाचे परिपक्व फल आहे. भागावात म्हणजे भाव, ज्ञान, वैराग्य, तप. जीवनरूपी सर्प कालरुपी गरुडाच्या चोचीमध्ये आहे. आणि तो जेव्हा काठारूपी भागिरथिमध्ये डुबकी मारतो तेव्हा तो मुक्त होतो. मंदिराचे काम सुरु झाल्यापासून येथे अनेक वेळा येणे झाले आहे. 
                                  आज सप्ताहाचा तिसरा दिवस असून तीन दिवसापासून सुरु असलेली मूर्ती प्राणप्रतिष्ठा आज पूर्ण झाली. दुपारी दोन वाजता रामगिरी महाराजांचे आगमन झाल्यानंतर प्रथम मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर कलशाचे पूजन करण्यात येउन महाराजांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले, कलशारोहण करण्यासाठी ग्रामस्तानी क्रेनची व्यवस्था केलेली होती. त्यानंतर हभप गाडेकर महाराज यांच्या हस्ते रामगिरी महाराज यांचे ग्रामस्तांच्या वतीने पूजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त ग्रामस्तांच्या वतीने सर्वाना पुरणपोळी च्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कोसाका चे आशुतोष काळे यांनी सप्ताहास सदिच्छा भेट दिली. 
                                   दुपारी २ ते ५ या वेळेत भागवताचार्य ह भ प केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेचे निरुपण होत आहे. या भागवत कथेला पहिल्या दिवपासूनच ठीकठिकाणाहून हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. सप्ताह प्रसंगी गावातील रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र आकर्षक रांगोळी काढण्यात आलेली होती, घरावर गुढ्या उभारण्यात आलेल्या होत्या, गावात येणा-या जाणाराचे जय हरी म्हणुन होणारे स्वागताने संपुर्ण बहादरपुर नगरी मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे, सप्ताह काळात सकाळी व संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी थंड पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. भाविकांच्या गाड्यांसाठी प्रशस्त व सुरक्षित पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसण्यासाठी सप्ताह मंडप अगदी प्रशस्त असून दुपारी भागवत कथेसाठी Fan ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण गावात विद्यत रोषणाई करण्यात आलेली आहे. भागवत कथेप्रसगी पांडुरंगगिरीजी महाराज वावीकर, स्वामी शिवानंदगीरीजी महाराज, अरविंद महाराज, बबन महाराज गाडेकर, रामप्रभु महाराज आदिसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत असतात. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन बहादरपूर ग्रामस्तानी अत्यंत आधुनिक व अद्ययावत प्रकारे केलेले आहे.





(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे सुरु असलेल्या साप्ताहप्रसंगी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करताना महंत रामगिरी महाराज. छाया- विकास गोर्डे समर्थ फोटो)

No comments:

Post a Comment