बहादरपूर हे बेटाशी निष्ठा असणारे गाव- महंत रामगिरी
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
दुपारी २ ते ५ या वेळेत भागवताचार्य ह भ प केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेचे निरुपण होत आहे. या भागवत कथेला पहिल्या दिवपासूनच ठीकठिकाणाहून हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. सप्ताह प्रसंगी गावातील रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र आकर्षक रांगोळी काढण्यात आलेली होती, घरावर गुढ्या उभारण्यात आलेल्या होत्या, गावात येणा-या जाणाराचे जय हरी म्हणुन होणारे स्वागताने संपुर्ण बहादरपुर नगरी मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे, सप्ताह काळात सकाळी व संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी थंड पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. भाविकांच्या गाड्यांसाठी प्रशस्त व सुरक्षित पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसण्यासाठी सप्ताह मंडप अगदी प्रशस्त असून दुपारी भागवत कथेसाठी Fan ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण गावात विद्यत रोषणाई करण्यात आलेली आहे. भागवत कथेप्रसगी पांडुरंगगिरीजी महाराज वावीकर, स्वामी शिवानंदगीरीजी महाराज, अरविंद महाराज, बबन महाराज गाडेकर, रामप्रभु महाराज आदिसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत असतात. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन बहादरपूर ग्रामस्तानी अत्यंत आधुनिक व अद्ययावत प्रकारे केलेले आहे.
(फोटो ओळी- कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे सुरु असलेल्या साप्ताहप्रसंगी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करताना महंत रामगिरी महाराज. छाया- विकास गोर्डे समर्थ फोटो)


No comments:
Post a Comment