रांजणगाव देशमुख येथील घटना ; सुमारे दोन लाखांचे नुकसान
रांजणगांव देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील रांजणगांव देशमुख येथील शेतकरी नवनाथ शिवराम वर्पे यांच्या तीन गायी एरंडाचे फोलकट खाल्याने दगावल्या असून यामुळे त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रांजणगाव देशमुख सह परिसरात मोठा दुष्काळ असल्याने जनावरांना चारा मिळत नसून गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी ऊस तोडीसाठी जात आहेत. व तेथून मिळालेल्या वाढ्यावर आपल्या जनावरांचा सांभाळ करत आहे.
या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांनी विषारी वनस्पतींपासून आपल्या जनावरांचे संरक्षण करावे असे वर्पे यांनी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment