Tuesday, 2 April 2019

एरंडाच्या फोलकटातून विषबाधा; तीन गायी दगावल्या


रांजणगाव देशमुख येथील घटना ; सुमारे दोन लाखांचे नुकसान
रांजणगांव देशमुख(वार्ताहर):-
                                             कोपरगाव तालुक्यातील रांजणगांव देशमुख येथील शेतकरी नवनाथ शिवराम वर्पे यांच्या तीन गायी एरंडाचे फोलकट खाल्याने दगावल्या असून यामुळे त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
                                               दिनांक ३१ मार्च रोजी सायंकाळी गायींना पाणी पाजत असताना त्या ठिकाणी बिया काढलेले एरंडाचे फोलकट पडलेले होते ते फोलकट गायिंनी खाल्ले त्यानंतर रात्री नऊ वाजता त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला काही कळायच्या आतच त्यातील दोन गायी दगावल्या व एका गायीवर उपचार सुरु असताना ती ही मरण पावली या घटनेमुळे वर्पे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
                                               रांजणगाव देशमुख सह परिसरात मोठा दुष्काळ असल्याने जनावरांना चारा मिळत नसून गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी ऊस तोडीसाठी जात आहेत. व तेथून मिळालेल्या वाढ्यावर आपल्या जनावरांचा सांभाळ करत आहे.
                                              या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांनी विषारी वनस्पतींपासून आपल्या जनावरांचे संरक्षण करावे असे वर्पे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment