सहभागी मुलांशी साधला संवाद
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
गीता परीवार आयोजित कोपरगाव येथे बाल संस्कार केंद्रामध्ये चालू असलेल्या
शिबिरास गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजयजी मालपाणी यांनी सदिच्छा भेट
दिली. यावेळी त्यांनी केंद्रात सहभागी मुलांना गीता अध्याय १२ व १५ यांचे
विस्तृत विवेचन केले. तसेच मुलांना विविध प्रसंग सांगून त्या द्वारे
योगा, आहार व प्रणवोच्चार किती महत्वाचे आहेत हे पटवून दिले.
शिबिरातील मुलांना ८ डिसेंबर २०१९ रोजी गीता जयंती निमित्त होणाऱ्या गीता
अध्याय १२ व १५ यांचे पठण कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले. आयोजकांना पुस्तके
भेट देऊन त्यांचा सन्मान केला. केंद्राचे नियुक्त पालक श्री अरुण लढ्ढा व
श्री संतोष भट्टड यांनीही संजयजी मालपाणी यांना पुस्तक देऊन त्यांचा सत्कार
केला. शिबिरामध्ये एकूण १२५ विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. १० दिवस चालू
असलेल्या या शिबिरात मुलांना गोष्ट, श्लोक, वारली पेंटिंग, हस्तकला असे
विविध प्रकार शिकविले जातात. सदर शिबिर पार पाडण्यासाठी सौ. विमल राठी,
सौ. ममता डागा , श्रीमती सरिता लाहोटी, चि. आशुतोष शिवाळ, सौ. जया शिवाळ,
श्री. राहुल बजाज, सौ.अर्चना वाणी ,कु. ऐश्वर्या भट्टड यांच्यासह अनेक
नवीन कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. सदर कार्यक्रमास. मुकुंद भुतडा, विनोद
डागा, सागर लाहोटी यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment