रांजणगाव देशमुख येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता
रांजणगाव देशमुख(वार्ताहर) :-
ते कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे अखंड हरीनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनात बोलत होते. ढोक महाराज पुढे म्हणाले की, ज्ञान, कर्म, योग हे मार्ग सामन्य माणसाला आचरणात आणणे आवघड आहे. त्यामधील सुक्ष्म चुक सुध्दा पापाला कारण होते.थोड्याशा भक्तीनेही शंकर प्रसन्न होतात. विष्णुभक्त श्रीमंत नसला तरी नामाने तारुण नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा मोठी आहे. त्यांचा राष्ट्रविकासातील वाटा अतिशय मोलाचा आहे. माणसाच्या जीवनातीच येरझार शांबवुन ईश्वराच्या रुपात विलीन होऊ शकतो. मानवी जिवनाचा उद्धार करण्यासाठी भक्तीसारखा सोपा मार्ग नाही.
..............................
फोटोओळी- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे अखंड हरीनाम सप्ताह निमीत्त जमलेले भाविक व ढोक हाराज. (छाया-किशोर शिंदे)



No comments:
Post a Comment