Wednesday, 20 June 2018

शालेय जीवन हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा- माणिकराव दिघे


रांजणगाव देशमुख (वार्ताहार):- शिक्षण हे समाज विकासाचे व परिवर्तनाचे महत्वाचे माध्यम असुन आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. तसेच शालेय जीवन हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वांत महत्वाचा टप्पा आहे. असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्यातील वेस- सोयगाव चे प्रथम लोकनियुक्त सरपंच माणिकराव दिघे यांनी केले. ते वेस येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्राम व बक्षिस वितरण सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशिनाथ खंडीझोड हे होते. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी जेष्ठ नेते भागवत खंडीझोड, रावसाहेब भडांगे, भाऊसाहेब खंडीझोड, कचेश्वर खंडीझोड, सचिन खंडीझोड, नारायण खंडीझोड, सिताराम खंडीझोड, राहुल खंडीझोड, प्रविण खंडीझोड, सुरेश खंडीझोड, सुकदेव पवार गणेश गुंजाळ, नितीन खंडीझोड, बाबासाहेब खंडीझोड, कोंडीराम खंडीझोड, प्रभाकर खंडीझोड, अनिल खंडीझोड, मंगल खंडीझोड, सुमनबाई खंडीझोड, बापु खंडीझोड आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन खंडीझोड व आभार नायायण खंडीझोड यांनी मानले.

No comments:

Post a Comment